शहरं
Join us  
Trending Stories
1
सूडानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
2
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
3
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
4
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
5
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
6
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
7
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
8
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
9
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
10
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
11
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
12
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
13
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
14
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
15
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
16
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
17
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
18
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
19
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
20
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात टंचाई उपाययोजनांची २८ टक्केच कामे मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 02:11 IST

अकोला : दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा बसणाºया गावांमध्ये तातडीच्या उपाययोजना पाणी टंचाई आराखड्यात समाविष्ट केल्या जातात. त्या उपाययोजनांना मंजुरी जिल्हाधिका-यांकडून घेत जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून कामे केली जातात. चालू वर्षात आतापर्यंत टंचाईचा दुसरा टप्पा आटोपत आहे, त्यासाठी उपाययोजनांपैकी केवळ २८ टक्केच कामांना मंजुरी मिळाल्याची माहिती आहे. उर्वरित ७२ टक्के कामांना येत्या काळात मंजुरी देऊन सुरुवात होणार आहे. तोपर्यंत जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा तीव्र होणार आहेत, हे निश्चित.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा बसणा-या गावांमध्ये तातडीच्या उपाययोजना पाणी टंचाई आराखड्यात समाविष्ट केल्या जातात. त्या उपाययोजनांना मंजुरी जिल्हाधिका-यांकडून घेत जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून कामे केली जातात. चालू वर्षात आतापर्यंत टंचाईचा दुसरा टप्पा आटोपत आहे, त्यासाठी उपाययोजनांपैकी केवळ २८ टक्केच कामांना मंजुरी मिळाल्याची माहिती आहे. उर्वरित ७२ टक्के कामांना येत्या काळात मंजुरी देऊन सुरुवात होणार आहे. तोपर्यंत जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा तीव्र होणार आहेत, हे निश्चित.नेहमीप्रमाणे चालू वर्षातही ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण होत आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने २०१७-१८ मध्ये उन्हाळ्यासाठी पाणी टंचाई आराखडा तयार केला. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात-२५९, दुसरा टप्पा-२३३, तिसरा टप्प्यात-७१ गावांमध्ये पाणी टंचाईचा अंदाज व्यक्त झाला, त्यानंतर झालेल्या सुधारणेनुसार ५३४ गावांमध्ये पाणी टंचाईच्या उपाययोजनांचा आराखडा अंतिम झाला. त्यातील पहिल्या टप्प्यातील उपाययोजनांचा काळ आटोपला. आता जानेवारी ते मार्च या दुसºया टप्प्यातील कालावधीची कामेही अंतिम होणे आवश्यक आहे, तर त्याचवेळी पुढील एप्रिल महिन्यात तीव्र टंचाईचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे. आतापर्यंत मंजूर आराखड्यातील उपाययोजनांची केवळ २८ टक्केच कामे पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यातील ५३४ गावांमध्ये असलेल्या एकूण १०८४ उपाययोजनांपैकी १९३ गावांमध्ये १९५ कामे पूर्ण झाली आहेत. त्याचवेळी १२६ गावांमध्ये ८५ उपाययोजनांची कामे सुरू असल्याची माहिती आहे. टंचाईग्रस्त गावे, त्यामध्ये करावयाच्या उपाययोजना आणि प्रत्यक्षात पूर्ण झालेली कामे पाहता टंचाई कामांची गती मंदावल्याचे चित्र जिल्हाभरात आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाण्यासाठी हाहाकार उडालेला असताना जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा विभाग, तसेच मंजुरी देणारा महसूल विभाग कमालीचे दुर्लक्ष करीत आहे. विशेष म्हणजे, पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ ग्रामस्थांवर आणली जात आहे. 

उपाययोजना १५ एप्रिलपर्यंत होणार! गावातील तीव्र पाणी टंचाईवर तातडीची उपाययोजना म्हणून १२८ गावांमध्ये विंधन विहिरी आणि कूपनलिकांच्या १४४ कामांना मंजुरी देण्यात आली. १२ मार्चअखेर त्यापैकी १२७ कामे पूर्ण झाली. त्यावर ६७ हातपंप बसविण्यात आले.  त्यातील १५ ठिकाणी वीज पंप आणि आरओ मशीनद्वारे पाणी पुरवठा सुरू झाला. पाणी पातळी खोल गेल्याने १२ विंधन विहिरी अयशस्वी झाल्या. नव्या आदेशानुसार ६४ गावांमध्ये ४२ विंधन विहिरी, २४ कूपनलिकांना मंजुरी देण्यात आली. त्यासाठीचे सर्वेक्षण पूर्ण झाले. येत्या १५ एप्रिलपर्यंत कामे पूर्ण होणार आहेत.

टॅग्स :Akola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालयAkolaअकोला